MPSC History
الذهاب إلى القناة على Telegram
Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialkatta
إظهار المزيد2025 عام في الأرقام

124 860
المشتركون
-5324 ساعات
-2677 أيام
-1 12730 أيام
أرشيف المشاركات
🟣 इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये 🟣
◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले
◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन
◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड
◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता
◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम
◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह
️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.
t.me/MPSCHistory
◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.
◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष
◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन
◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी
◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी
◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय
◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक
◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी
◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर
◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार
◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.
◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु
◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.
◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.
◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.
◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे
◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.
◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही.
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक
◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी
◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.
◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.
◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक
◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना
◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स
📌📌जॉईन - t.me/MPSCHistory
❤ 40👎 1
Photo unavailableShow in Telegram
🔴 गट ब साठी
🟢 एक दिवशीय इतिहासाचे मोफत रिव्हीजन Lecture.
🗓 दिनांक: 21 डिसेंबर.
⏰ वेळ: सकाळी 10वा.
🏛 ठिकाण: एन. श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट.
टीप: Short Notes Office च्या बाजूला Xerox मध्ये मिळतील.
☎️ संपर्क: 9004611932, 9545600535
❤ 4
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर
२०२५
👉 ९ नोव्हेंबर २०२५
जॉइन करा @eMPSCkatta
MPSC PRE PAPER 1.pdf18.03 MB
❤ 26🤔 1
Repost from MPSC Science
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
❤ 20
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
आज झालेला GS पेपर
जॉइन करा @empsckatta
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf34.81 MB
❤ 12
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
Photo unavailableShow in Telegram
राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर
लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl
आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर
❤ 16🔥 1
व्हॉट्स ऍपवर स्पर्धा परीक्षांच्या लेटेस्ट अपडेटसाठी खालील लिंक वरून जॉइन करा आमचे WhstaApp चॅनेल:
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
❤ 5
★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★
★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★
◆ मुंबई विद्यापीठे - मुंबई - १८५७
◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर - 1923
◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे -1949
◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958
◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962
◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983
◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989
◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव - 1990
◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993
◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921
◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004
◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
❤ 38🔥 2🥰 1
☘ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे ☘
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
✅अशाच महत्वाच्या माहितीसाठी
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
❤ 53👎 1
प्राचीन भारतातील जैन महासभा (Jain Councils)
दोन मुख्य जैन महासभा झाल्या आहेत.
1) पहिली जैन महासभा
➤ काल : इ.स.पू. 3 रे शतक (बुद्धानंतर थोड्याच काळाने)
➤ ठिकाण : पाटलिपुत्र
➤ संरक्षक राजा : चंद्रगुप्त मौर्य
➤ अध्यक्ष : स्थूलभद्र स्वामी (भद्रबाहूंचे शिष्य)
➤ महत्त्व :
जैन धर्म दोन पंथात विभागला :
✔ श्वेतांबर (पांढरे वस्त्रधारी) – पश्चिम भारतात स्थायिक झाले
✔ दिगंबर (नग्न साधू) – दक्षिण भारतात गेले (भद्रबाहूंच्या नेतृत्वाखाली)
ग्रंथांचे संकलन करण्यास प्रारंभ
2) दुसरी जैन महासभा
➤ काल : इ.स. 512
➤ ठिकाण : वल्लभी (सौराष्ट्र, गुजरात)
➤ संरक्षक राजा : गुहसुर राजवंशाचा राजा ध्रुवसेन (ध्रुवसेन प्रथम बलाढ्य)
➤ अध्यक्ष : देवर्धिगणी क्षमाश्रमण
➤ महत्त्व :
श्वेतांबर जैनांचा पवित्र साहित्य संकलित व लिखित स्वरूपात आणले.
12 अंग व इतर उपांगांचे संकलन करून जैन आगम साहित्य तयार केले.
Summary
✔ जैन महासभा फक्त दोन – पाटलिपुत्र (इ.स.पू. 3 रे शतक) व वल्लभी (इ.स. 512).
✔ पाटलिपुत्र महासभा – चंद्रगुप्त मौर्य संरक्षण, स्थूलभद्र अध्यक्ष, दिगंबर–श्वेतांबर विभाजन.
✔ वल्लभी महासभा – ध्रुवसेन संरक्षण, देवर्धिगणी अध्यक्ष, जैन आगम साहित्य संकलन.
✅राज्यसेवा पूर्व 2025✅
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
❤ 31🙏 5
✅✅प्राचीन भारतातील चार बौद्ध परिषदा (Buddhist Councils)
1) पहिली बौद्ध परिषद (First Buddhist Council)
➤ इ.स.पू. 483 (बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी)
➤ ठिकाण : राजगृह (राजगीर, बिहार)
➤ संरक्षक राजा : अजातशत्रू (मगध साम्राज्य)
➤ अध्यक्ष : महाकश्यप
➤ महत्त्व :
बुद्धांच्या उपदेशांचे संकलन करण्यात आले.
उपालीने विनयपिटक वाचून दाखवला.
आनंदाने सुत्तपिटक वाचून दाखवला.
2) दुसरी बौद्ध परिषद (Second Buddhist Council)
➤ इ.स.पू. 383
➤ ठिकाण : वैशाली
➤ संरक्षक राजा : कालासोक (शिशुनाग वंश)
➤ अध्यक्ष : सब्बकमि
➤ महत्त्व :
भिक्षूंमध्ये शिस्त व आचारसंहिता यावर वाद.
बौद्ध संघात पहिली फूट पडली:
✔ स्थविरवादिन (थेरवाद) – कडक आचारसंहितेचे समर्थक
✔ महासांघिक – उदारमतवादी
3) तिसरी बौद्ध परिषद (Third Buddhist Council)
➤ इ.स.पू. 250
➤ ठिकाण : पाटलिपुत्र (पाटणा)
➤ संरक्षक राजा : अशोक मौर्य
➤ अध्यक्ष : मोग्गलिपुत्त तिस्स
➤ महत्त्व :
बौद्ध संघातील अप्रामाणिक भिक्षू काढून टाकले.
अभिधम्म पिटक संकलित झाला.
मोग्गलिपुत्त तिस्स यांचा "कठावस्तु" ग्रंथ रचला गेला.
बौद्ध धर्म प्रचारासाठी अशोकाने धर्मदूत विविध देशात पाठवले (श्रीलंका, ग्रीस, इजिप्त इ.).
4) चौथी बौद्ध परिषद (Fourth Buddhist Council)
➤ इ.स. 72 (किंवा इ.स. 1 शतक)
➤ ठिकाण : कुंदलवन विहार, काश्मीर
➤ संरक्षक राजा : कनिष्क (कुषाण साम्राज्य)
➤ अध्यक्ष : वसुबंधु/वसु मित्र (काही ग्रंथांनुसार वसुबंधू; बहुधा वसु मित्र प्रमुख)
➤ महत्त्व :
बौद्ध धर्म दोन मुख्य पंथात विभागला :
✔ हीनयान – थेरवाद परंपरा
✔ महायान – नवीन उदारमतवादी विचार
बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रसार
Summary:
✔ पहिली परिषद – राजगृह, अजातशत्रू, महाकश्यप, विनयपिटक व सुत्तपिटक.
✔ दुसरी परिषद – वैशाली, कालासोक, फूट – स्थविरवादिन व महासांघिक.
✔ तिसरी परिषद – पाटलिपुत्र, अशोक, मोग्गलिपुत्त तिस्स, अभिधम्मपिटक, कठावस्तु, धर्मदूत.
✔ चौथी परिषद – काश्मीर, कनिष्क, वसु मित्र, हीनयान व महायान विभाजन.
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
❤ 44👎 2👏 2
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
❤ 15👎 1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
📚 हेन्री डेरोजिओ आणि "यंग बंगाल मूव्हमेंट" : १९व्या शतकातील कलकत्त्यातील सामाजिक क्रांती
डेरोजिओचा परिचय
➤ हेन्री डेरोजिओ (1809–1831) हा इंडो-पोर्तुगीज वंशाचा विचारवंत, कवी आणि शिक्षक होता.
➤ १८२६ मध्ये तो कलकत्त्यातील हिंदू कॉलेज (आधुनिक प्रेसिडेन्सी कॉलेज) मध्ये प्राध्यापक झाला.
➤ त्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विचारमुक्ती, विवेक, आधुनिकता आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन विकसित करणे हा होता.
यंग बंगाल चळवळ (Young Bengal Movement)
➤ डेरोजिओच्या शिष्यांना "Derozians" किंवा "Young Bengal" असे म्हणले गेले.
➤ त्यांची वैशिष्ट्ये :
► विचारस्वातंत्र्याचा आग्रह
► सामाजिक-धार्मिक प्रथा व अंधश्रद्धांना विरोध
► स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार
► वसाहतवाद व गुलामीला विरोध
► धर्मनिरपेक्ष, समतावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
डेरोजिओच्या विचारांचे महत्त्व
➤ डेरोजिओ म्हणाला की गुलाम माणसाला स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगणे आवश्यक आहे.
➤ "स्वातंत्र्य हे प्रत्येक मानवाचे नैसर्गिक हक्क आहे" ही धारणा पसरवली.
➤ यंग बंगालांनी चर्च व धर्मसंस्थांच्या अंधश्रद्धेला आव्हान दिले.
➤ त्यांनी वादविवाद, लेखन, भाषणे याद्वारे सामाजिक सुधारणांचा प्रचार केला.
बौद्धिक व सामाजिक प्रभाव
➤ "Derozians" हे केवळ सुधारक नव्हते, तर विचारप्रवर्तक व क्रांतिकारी होते.
➤ त्यांनी आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून नवा समाज घडवण्याचा प्रयत्न केला.
➤ सामाजिक विषय :
► जातिभेद व अस्पृश्यता यांना विरोध
► स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार
► लोकशाहीवादी दृष्टीकोन
► विज्ञान व तर्कशास्त्रावर आधारित शिक्षण
साम्राज्यवादी दृष्टीकोनाशी संघर्ष
➤ डेरोजिओ व त्याचे शिष्य हे मॅकॉलेच्या "अँग्लिसायझेशन" धोरणापेक्षा वेगळे होते.
➤ ते इंग्रजी शिक्षणाला साधन मानत, पण त्याद्वारे भारतीय समाजाचा प्रगत विचारांचा विकास व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती.
➤ इंग्रजी शिक्षणाचा वापर भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी नव्हे, तर मुक्त विचारांसाठी व्हावा असा त्यांचा आग्रह होता.
डेरोजिओनंतरचे परिणाम
➤ डेरोजिओ फक्त २२ वर्षांचा असतानाच (१८३१) मृत्यू पावला, पण त्याची विचारधारा जिवंत राहिली.
➤ यंग बंगालांचे पुढील शिष्य नंतरच्या समाजसुधारकांना प्रेरणा देत राहिले.
➤ त्यांचा प्रभाव ब्रह्मो समाज, भारतीय राष्ट्रवाद, समाजसुधारणा चळवळींवर स्पष्ट दिसून येतो.
डेरोजिओच्या चळवळीचे मर्यादित स्वरूप
➤ त्यांचा प्रभाव मुख्यतः उच्चवर्गीय, इंग्रजी शिकलेल्या तरुणांमध्ये होता.
➤ ग्रामीण व खालच्या वर्गातील समाजावर त्याचा थेट परिणाम कमी.
➤ प्रत्यक्ष सामाजिक सुधारणांच्या अंमलबजावणीत त्यांचे यश मर्यादित राहिले.
पूरक माहिती
➤ डेरोजिओ याला "भारताचा पहिला आधुनिक बंडखोर शिक्षक" असे म्हटले जाते.
➤ त्याच्या विचारसरणीचा पुढे गांधी, नेहरू, विवेकानंद अशा अनेक विचारवंतांवर अप्रत्यक्ष परिणाम झाला.
➤ यंग बंगालांनी भारतीय समाजात "तर्कशीलतेचा बीज" रोवले, जे पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अंकुरले.
➤ त्यांच्या चळवळीने भारतीय बुद्धिजीवींमध्ये "राष्ट्रवादाची बीजे" पेरली.
✅ निष्कर्ष :
हेन्री डेरोजिओ आणि यंग बंगालांनी अल्पावधीत भारतीय समाजाला विचारस्वातंत्र्य, तर्कशक्ती आणि आधुनिकतेचा नवा मार्ग दाखवला. जरी त्यांची चळवळ अल्पजीवी ठरली, तरी तिच्या प्रभावाने पुढील शतकात भारतीय समाजसुधारणा आणि राष्ट्रवादी जागृती यांचा पाया मजबूत झाला.
🔥जॉईन🔥 @MPSCHistory
❤ 39🔥 2👏 2
